Lifestyle

Post Page Advertisement [Top]



✍🏻 डॉ. राजेंद्र पवार

प्रत्येक वेळी, जग अशा व्यक्तींच्या जन्माचे साक्षीदार आहे ज्यांनी समाजाला परिवर्तन केले आणि समाजातील मार्गावर अमिट प्रभावाची छाप टाकली. अशाच एका व्यक्ती म्हणजे डॉ. राजेंद्र पवार, समाजाच्या उन्नतीसाठी लोकसेवेतून निःस्वार्थ सेवेची जाण ठेवून सामाजिक कार्य करत असणारे. डॉ.राजेंद्र पवार यांच्या जीवनकथेत ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही तर, प्रेरणादायी आणि आत्मविश्वास व वेगवानतेचा सामर्थ्यवान दाखला आहे.

डॉ.राजेंद्र पवार हे मूळचे सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्यातील छोटंसं गावं जातेगांव, त्यांचा जन्म अहिल्यानगर ला मामांकडे झाला. डॉ. राजेंद्र पवार यांचे वडील 6 वी मध्ये शिकत असताना निघून गेले. राजेंद्र पवार हे ठिकठिकाणी होत असलेल्या ज्वलंत समस्यांवर चिंतनशील व सृजनशील दृष्टिकोन ठेवून उपाय सुचविणारे समाजसेवक आहेत. त्यांच्या घरची पार्श्वभूमी अत्यंत हालाखीची होती पण त्यांच्या चिकाटीने व मेहनतीने त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात यश संपादन केले.

अडचणीच्या काळातही त्यांनी शिकण्याची जिद्द पुढे नेली व उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या सामाजिक जाणिवेतून त्यांनी गावोगावी, जिल्होगावी, राज्योगावी व देशभरात असंख्य सामाजिक उपक्रम राबवले.

डॉ. राजेंद्र पवार यांना नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याची आवड लहानपणापासूनच होती म्हणूनच त्यांनी उद्योजक होण्याचा मार्ग हजारो अडचणींना चिरडत निवडला. डॉ. राजेंद्र पवार यांनी २०१२ साली पुण्यामध्ये आले. उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवत ठोसपणे व्यवसाय करण्यास सुरुवात केली. डॉ. किसन पवार ह्या त्याच्या उद्योग क्षेत्रातील मूळ प्रेरणादाई ठरला.

त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवताना अनेक अडचणी-संकटांचा सामना करून स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले. व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल करीत आज हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.

त्यांच्या अनुभवावर समाजसेवेसाठीचा आवड निर्माण होत गेली. २०१६ पासून डॉ. राजेंद्र पवार यांनी सामाजिक कार्यामध्ये सुरुवात केली. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या आयुष्यातील अनुभवांच्या आधारे समाजातील अडचणींवर उपाय शोधत स्वतःला पुढे नेले.

त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठा वाटा उचलला. बहुजन समाजातील लोकांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य सुरू केले. विविध ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह वसतिगृहाची व्यवस्था करून बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. हजारो विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या आयुष्यात माणूस म्हणून उभे राहण्यासाठी संधी प्राप्त करून दिली.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आजपर्यंत हजारो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन हजारो लोकांच्या जीवनात घडवून आणले आहे.

२०१९ मध्ये डॉ. राजेंद्र पवार यांनी शैक्षणिक उद्योग क्षेत्रामध्ये कार्य सुरू केले, हजारो मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्याचबरोबर २०२० साली लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप करून अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला.

त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कोविडच्या काळात गरजूंना वैद्यकीय साहित्य दिले. संपूर्ण महाराष्ट्रातील अशा विविध किनारपट्टी कोरोनाच्या काळातील गरजूंपर्यंत पोहोचून त्यांनी मदत केली.

त्याचप्रमाणे, त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातही सामाजिक कार्याचा विस्तार केला आहे.

समाजातील व शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल डॉ. राजेंद्र पवार यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार, महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार, महाराष्ट्र उत्कृष्ट नेतेत्व जननायक पुरस्कार, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार, महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र सर्वोत्तम पुरस्कार, महाराष्ट्र युवा नेते पुरस्कार, भारत जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार, भारत समाज कार्यरत गौरव पुरस्कार, भारत उद्योजक सन्मान गौरव पुरस्कार, भारत मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार, भारत उत्तम युवा राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय Humanitarian पुरस्कार, Global leadership आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय peace पुरस्कार असे शंभराहून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे..

Bottom Ad [Post Page]

Distributed by ProTemplates